सध्या फेसबुकवर राजकीय/वैचारिक इकोसिस्टम विषयी चर्चा चालू आहे. महाराष्ट्रातील मातब्बर राजकारणी श्री शरद पवार यांची इकोसिस्टम किती प्रभावी आहे आणि सत्ता असो वा नसो ते त्या यंत्रणेचा कसा फायदा करून घेतात आणि हिंदुत्ववादी भाजपला अशी राजकीय सामाजिक वैचारिक इकोसिस्टम का उभी करता आली नाही अशा आशयाची ही चर्चा आहे. "अशा इकोसिस्टमची गरजच काय?" "RSS ची यंत्रणा आहे ना!" "...मग पवार साहेबांचे 4 च खाजदार का निवडून येतात?" ... अशा प्रकारचे मतप्रदर्शन काही भाजप समर्थकांनी केले. खरंतर या विषयावर बोलताना आपल्याला हे समजून घेता आले पाहिजे की ही यंत्रणा 'वैचारिक' आहे. इथे एकाच विचाराचे पत्रकार, लेखक, विचारवंत, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक क्षेत्रातील लोक एकत्र आले आहेत. आणि तो विचार 'डावा' आहे हे लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात या यंत्रणेला आपण लेफ्ट इकोसिस्टम म्हंटल तरी हरकत नसावी. शरद पवार हे या इकोसिस्टमचा एक भाग आहेत. हे मान्यच की महाराष्ट्रात ही यंत्रणा उभी करण्यात त्यांचं योगदान आहे. पण काँग्रेस सुद्धा त्याच विचारांची असल्यामुळे आणि पर्यायाने ती
मराठी ब्लॉग
हा ब्लॉग खेळ, सिनेमा आणि अन्य वेगवेगळ्या विषयांवर आहे.